Sunday, February 26, 2017

आज चा दिवस, २७ फेब्रु., कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्म दिवस. ह्या निमित्ताने त्यांची आठवण.
स्वत:च्या कविते विषयी त्यांची भावना.....
समिधाच सख्या या....

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवनसरिता,
खळखळे, अडखळे, सुके कधी फेसाळ
परि अखंड शोधे वाट समुद्राकारिता !

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली !

नव पर्णाच्या या विरल मांडवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
" या जळोत समिधा - भव्य हवी वृक्षाली ! "

समिधाच सख्या या , त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष या , एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !

खरोखरच ह्या आणि अश्यांसारख्या असंख्य मराठी कविता तुमच्या आमच्या मनामधे क्षणभर तरी हा अग्नी फुलवतील ह्याच या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !!

मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन -      

होत्या लाटा उधळीत आपुली फेनिल कविता
फुलाफुलांतून अखंड उमलत होती नवता
होते वारे वाहत, तारे होते चमकत
बाभळीवर ही गुच्छ फुलांचे होते लगडत
रे कसे वेगळे म्हणू सांग तुज यांच्यापासून??
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

उठूनि पहाटे जावे तर तू रंगच व्हावे
नभी पहावे तर तू ढग होऊन झुलावे
या धारातून तुझे कृपामाय हात दिसावे
किरणांच्या अधरांवर स्मित ताव फुलावे
हे डोळे भरुनी बघतो आहे सारे आनुंदीन
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

तू नाहीस? या वसंतातुनी कोण फुले मग?
तू नाहीस? दवबिंदूत का मग झगमग झगमग
तुझ्यावाचुनी बीजांमधूनी कोण फुले रे?
तुझ्यावाचुनी रांगांमधून कोण फुले रे?
मी कधी न पाहिले तुझे निराळेपण त्याच्याविण
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

हेलावे जनसागर माझ्या अवतीभवती
खरे सांग, ही नाना रूपे तुझीच नव्हती?
मनामनातून त्यांच्या होती तुझी चेतना
कर्माकर्मातून  होती तुझी प्रेरणा...!
मी कसे उणे तुज करू त्यांचिया सुखदुःखातुन ?
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

तुला पाहिले ऋतुंऋतुंतुन, फुलाफुलांतून
त्या गगनातुन, या मातीतून, स्थितिगतीतून
संघर्षातुन , सुखदुःखांतून , व्यथेव्यथेंतून
या सृष्टीतून अन भावतीच्या मानवतेतून
रे कसे शोधू तुज वेड्यापरी मी तुलाच टाकून?
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन


- मंगेश पाडगावकर
















Thursday, February 23, 2017

तिला विचारलंच नाही.

ज्या क्षणी पाहिले तिला...
होकार गृहीतच धरला...!
मी तुला आवडलो का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

सप्तपदी चालतांना...
घुटमळली पाऊले तिची...!
हुरहुर कसली होती...?
*तिला विचारलंच नाही...!!*

माप ओलांडतांना उंबरठ्याचं...
मी आलो सहज आत...!
तुलाही यावंस वाटतंय का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

झाली पहिली भेट...
किती आतुर होतो मी...!
ओढ तुलाही आहे का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

वंशाला दिवाच हवा...
सांगून मोकळा झालो...!
पण आई व्हायचंय का...?
तिला विचारलंच नाही...!!

संगोपन करतांना मुलांचं...
कसरत होत होती तिची...!
गरज माझीही लागेल का...?
तिला विचारलंच नाही...!!

आयुष्यभर दिली साथ...
झाली सुख दु:खाची सोबती...!
कधी मन तिचं दुःखलं का...?
तिला विचारलंच नाही...!!

न मागताच तिच्याकडून...
घेतलं मी सारं काही...!
तुलाही काही हवं का...?
तिला विचारलंच नाही...!!

खरंच किती स्वार्थी झालो...
गृहीतच धरलं मत तिचं...!
तिचं मन काय म्हणतं...?
तिला विचारलंच नाही...!!

Wednesday, February 22, 2017

आई म्हणायची

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर
कधी काढू नये राग,
कोणाला लागली लाथ तर,
लावायची पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.

मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.

त्यांना  कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .

तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..

तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.

त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”

त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.


Monday, February 20, 2017

त्रासाचे झाड

 दादांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे.

 कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. दादांना परिस्थिती सोसेनाशी झालेली.

 ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत दादा निघाले.

 संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले.

 दादांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा दादांच्या गाडीत बसला.

 कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही.

 गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने दादांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले.

 उशीर झालेला तरी दादा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून दादा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले.

 घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले.

दादांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले.

त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. दादांसाठी मस्त चहा आण पाहू.

 समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. दादांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले.

ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला?

गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद?

 दादांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन दादा निघाले. भाचा दादांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला.

गाडीत बसता बसता दादांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा.

त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’

 त्यावर भाचा म्हणाला, ‘‘दादा, मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो.

त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो.

पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत.

हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे.

घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.

ती -





ती माझी मुलगी लग्न होऊन गेली
घरातली सारी किलबिल घेऊन गेली

माझ्या डोळ्यांपुढची वाट सारी धुकं धुकं झाली
तिची मांजरी, तिची पुस्तकं
तिची वाद्य, तिची घुंगर
लाडके कपडे व पत्रं
तिचे फोटो तिची चित्रं
कुणी गात नाही, हसत नाही
सगळ्यांना ती जाताना stachu  म्हणून गेली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली


इवली असल्यापासून इथे तिचंच राज्य होतं
जरा कुठे गेली की घर कावरबावर होत होतं
तिचं बोलणं , तिचं हसणं
रागानं कधी तणतण करणं
तिचं गाणं , तिचं नाचणं
मनापासून चित्र काढणं
तिच्यामुळे आमच्या घराची मैफल रंगत गेली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली


आमच्या गप्पा आमची गुपितं
आमचा स्वैपाक बाहेर जाणं
आमच्या टिंगल आमची भांडण
चिडवाचिडवी ,खरेद्या करणं
स्वप्नं चिंता वैताग सांगणं
एकमेकींना घडवत राहणं
पोकळी म्हणजे काय याची समज आली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली


बावीस  वर्ष मुलगी आपल्याला किती काय काय देते
वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमानं शिकवत राहते
माया देते, धीर देते आपल्यासाठी तीच कळवळते
ओझं कसलं फुलपाखरू ते याची जण आली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली


तिच्या माझ्या धाग्याचं एक नातं विणलं आहे
तिचे वेगळे, माझे वेगळे रंग होणार आहे
नवं नातं विणण्यात आता ती गुंतली आहे
त्याचे रंग सुंदर वेगळे मला कळतं आहे
एकमेकींचा कोपरा झालो त्याची जाणीव झाली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली




शोभा भागवत





ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी गावीत

ज्यांच्या अंगणात ढग आले
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे

ज्यांना आभाळाएवढी उंची लाभली
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे पाय मळले
त्यांना  थोडे उचलून घ्यावे.

                                   - दत्ता हलसगीकर 

हस्तांतर

हस्तांतर - द . भा . धामणस्कर


विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला ; द्या इकडे
मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून,
तर मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरंकल्याच्या ....
मी पुन्हा तरुण ययातीसारखा
माझा मुलगा जक्ख म्हातारा
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.... 

शब्द

शब्द भावनांचे रूप
शब्द डोळियांचे सुख
शब्द वेदनेची वाणी
शब्द आनंदाची गाणी
 


                        शब्द  उफाळते लाव्हा
                        शब्द  सुखद गारवा
                        शब्द रुसवा फुगवा
                        शब्द प्रीतीचा ओलावा


शब्द निरागस बाल्य
शब्द मनातले शल्य
शब्द पावसाचे पाणी
शब्द जिवलग कोणी


                        शब्द ममतेचा हात
                        शब्द जिव्हारी आघात
                        शब्द अर्धभारवाही
                        शब्द त्यातून ही  काही 

Friday, February 17, 2017

हा लेख  सकाळमध्ये श्री प्रसाद इनामदार यांनी लिहिलेला आहे... खुप सुंदर लिहिले आहे .... 

ती........
..पत्राच्या वरच्या मायन्यामध्ये सुरवातीला काही ओळी रिकाम्या सोडल्यात. कारण तेथे काय लिहायचं हे सुचलेलं नाही म्हणून नव्हे तर तेथे किती आणि काय-काय लिहायचं यावरून माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला आहे म्हणून. खरं तर खूप काही लिहावं, व्यक्त व्हावं, भावनांना वाट मोकळी करून द्यावी असं वाटूनही मी त्यांना बांध घालण्याचा प्रयत्न केलाय. कारण तेथे वापरावयाचे तोलामोलाचे शब्दच माझ्यावर रुसलेत. ते मला फितूरच होत नाहीत. कंटाळून मग मी तो प्रयत्न सोडून दिलाय. आता तुम्ही म्हणाल असं काय बुवा तेथे लिहिणार होतास? 

खरं तर मीही तोच विचार करतोय, आपण तेथे काय लिहिणार होतो? कारण मी जे लिहायचा विचार करतोय ते शब्दबद्ध करू शकेन हा विश्‍वासच माझ्या ठायी उरलेला नाही. कागद, पेन घेऊन सरसावून बसलोय खरा; पण तिच्याबद्दल मी विचार करू लागतो आणि "ती' मला असंख्य रूपांत भेटू लागते आणि मग त्यातल्या कोणत्याच रूपाला मी न्याय देऊच शकत नाही याची जाणीव मला मागे खेचून घेते कारण.... 

"ती' अंबिका..."ती' दुर्गा..."ती' सरस्वती..."ती' रणचंडिका..."ती' सीता..."ती' मंदोदरी..."ती' अहल्या..."ती' द्रौपदी..."ती' उर्मिला..."ती' सारा पुराण व्यापून राहिलेली त्यागाची मूर्ती... 
"ती' शिवबाला घडविणारी "जिजाऊ'..."ती' झाशीची राणी लक्ष्मीबाई...ती देशासाठी रक्त सांडलेली कणखर "इंदिरा', "ती' डेअरर किरण बेदी... 
"ती' वात्सल्यमूर्ती मदर तेरेसा... 
"ती' अनेक श्‍वासांना थबकवणारी गानकोकिळा लता... 
"ती' आयर्न लेडी... 
"ती'....ही यादी खूप मोठी...वाढतच राहणारी...कारण "ती' शब्दांत न मावणारी. 

...पण तरीही "ती' 
...माझी जन्मदात्री... वात्सल्यसिंधू... माझी दिशादर्शी... माझ्या पाऊलखुणा जपणारी...माझं बालपण हृदयात जपून ठेवणारी... जगाची ओळख करून देणारी... मुक्त विहरण्यासाठी माझ्या पंखांत बळ भरणारी... माझ्या यशासाठी कण कण झिजलेली... माझ्या इवल्याशा यशानेही आनंदून तृप्त झालेली...अजूनही होणारी... माझ्या चुका सुधारून मला जगण्याचं बळ दिलेली...देणारी....संसाराचा भार उचलून चेहऱ्यावर कष्टाचा मागमूसही न दाखविणारी... आणि खूप काही... माझी आई. 

"ती' माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी.... माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवून तिच्या आईला दुरावलेली....संसाराचा तोल सावरणारी...माझ्या यशावर जानसे फिदा झालेली.... माझ्यातल्या मला सावरणारी... मी चूक असलो तरी बरोबर मानून सप्तपदीचा मान राखणारी....हळुवार समजावणारी.... पत्नी.... प्रेयसी... माझी.... अर्धांगिनी.... माझ्या पिलांची "आई' आणि अद्यापही मला पुरती न उमगलेली माझी सखी. 

"ती' माझा अंश.... माझी प्रतिमा.... माझे प्रतिरूप.... माझ्या स्वप्नांची मुक्त भरारी.... छोट्याशा बाळमुठींतून माझ्या सुखांचे हळवे कोपरे समृद्ध करणारी.... माझ्यावर बिनधास्त विश्‍वासून आयुष्याला बेधडक सामोरी जाणारी.... सारं जग मुठीत घेऊन गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा बाळगणारी.... येणाऱ्या प्रत्येक क्षणांना भिडण्याची पात्रता अंगी बाळगणारी...."बाबा' या दोन शब्दांतून परमोच्च आनंद देणारी....सनई चौघड्यांच्या साक्षीने दुरावताना डोळे पुसून मलाच धीर देणारी... माझी चिमुरडी... माझी बालमैत्रीण.... 

"ती' बटवा घेऊन माझं बालपण जपणारी.... आयुष्यभराची शिदोरी पुरविणारी...ती संस्कारांचं बाळकडू पुरविणारी...माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी...चुकल्यावर कुशीत घेऊन समजावणारी.... माझ्यासाठी आईलाही "सुनावणारी' माझी मायाळू आजी.... 

या नात्यांशिवायही "ती' अनेक ज्ञात-अज्ञात रूपांतून भेटणारी...अमीट, असामान्य कामगिरी करणारी....जेथे आम्ही श्‍वास घेतो ती "वसुंधरा'....ती...."ती'....बस्स! आता मात्र किती लिहू आणि काय लिहू असं झालंय म्हणून थांबतो. 

आता आलं लक्षात, मी वरच्या मायन्यामध्ये काहीच का लिहू शकलो नाही. कारण माझ्यात "तिला' शब्दबद्ध करण्याचे बळच नाही. कारण "ती' अमर्याद, उत्तुंग, स्वच्छंद, गहिरी, अथांग, शब्दातीत आणि.... 
पाहिलंत असं होतं! 
"तिला' लाख-लाख प्रणाम!
When I started loving myself
I understood that I’m always and at any given opportunity
in the right place at the right time.
And I understood that all that happens is right –
from then on I could be calm.
Today I know: It’s called TRUST.

When I started to love myself I understood how much it can offend somebody
When I tried to force my desires on this person,
even though I knew the time is not right and the person was not ready for it,
and even though this person was me.
Today I know: It’s called LETTING GO

When I started loving myself
I could recognize that emotional pain and grief
are just warnings for me to not live against my own truth.
Today I know: It’s called AUTHENTICALLY BEING.

When I started loving myself
I stopped longing for another life
and could see that everything around me was a request to grow.
Today I know: It’s called MATURITY.

When I started loving myself
I stopped depriving myself of my free time
and stopped sketching further magnificent projects for the future.
Today I only do what’s fun and joy for me,
what I love and what makes my heart laugh,
in my own way and in my tempo.
Today I know: it’s called HONESTY.

When I started loving myself
I escaped from all what wasn’t healthy for me,
from dishes, people, things, situations
and from everyhting pulling me down and away from myself.
In the beginning I called it the “healthy egoism”,
but today I know: it’s called SELF-LOVE.

When I started loving myself
I stopped wanting to be always right
thus I’ve been less wrong.
Today I’ve recognized: it’s called HUMBLENESS.

When I started loving myself
I refused to live further in the past
and worry about my future.
Now I live only at this moment where EVERYTHING takes place,
like this I live every day and I call it CONSCIOUSNESS.

When I started loving myself
I recognized, that my thinking
can make me miserable and sick.
When I requested for my heart forces,
my mind got an important partner.
Today I call this connection HEART WISDOM.

We do not need to fear further discussions,
conflicts and problems with ourselves and others
since even stars sometimes bang on each other
and create new worlds.
Today I know: THIS IS LIFE!
कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते, गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते.... गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते, तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते.... अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात, चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात.... आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी, चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी ..........................
*सौ. सुधा मुर्ति*

बऱ्याच स्त्रियांना शारिरीक
सौंदर्याचा न्युनगंड असलेला,
मी समाजात, वावरत असतांना
माझ्या निरीक्षणात येतो...

पण, खर सांगू मैत्रिणींनो...
पुरूषांना कांय आवडेल,
याचा विचार करून स्वतःला
घडवू नका...

*पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य*
*तोलणं, म्हणजे स्वतः मधील*
*स्त्रीत्वाचं अधःपतन करवून*
*घेणं आहे...*

सकाळी उठून सडा-संमार्जन
झाल्यावर स्वतःच्या हातानं
काढलेली रेशीमरेषांची रेखीव
रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला
तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...

स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ
स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या
गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!

तुम्ही शिक्षिका असाल, तर
तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे
लिहिलेल्या अक्षरात असेल.
विषयाचं आकलन झाल्यावर
दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे,
ही तुमचीच सुंदरता आहे...

सौंदर्य कपड्यात नाही,
कामात आहे....

सौंदर्य नटण्यात नाही,
विचारांमधे आहे...

सौंदर्य भपक्यात नाही,
साधेपणांत आहे...

सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे...!!

आपण करत असलेलं
प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच
सादरीकरण असतं...!!

आपल्याला आपल्या कृतीतून
सौंदर्याची निर्मिती करता आली
पाहीजे...

प्रेमानं बोलणं
म्हणजे सुंदरता...!!

आपलं मत योग्य रीतीनं
व्यक्त करता येणं
म्हणजे सुंदरता...!!

नको असलेल्या गोष्टीला
ठाम नकार देण्याची हिंमत
म्हणजे सुंदरता...!!

दुसर्‍याला समजावून घेणं
म्हणजे सुंदरता...!!

आपल्या वर्तनातून, विचारातून
आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.

हाती आलेला प्रत्येक क्षण
रसरशीतपणे जगण्यांत
खरी सुंदरता आहे...!!

आपण करीत असलेल्या
कामात कौशल्य प्राप्त झालं,
की आपोआपच आत्मविश्वास
वाढतो, आत्मसन्मानाची
जाणीव येते...

*अशी आत्मविश्वासानं*
*जगणारी स्त्री आपोआप*
*सुंदर होते, हा माझा*
*स्वानुभव आहे...*

इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर
निर्णयक्षमतेत होतं,...

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या
ठोशात आहे...

बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या
असामान्य प्रतिभेत होतं...

लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या
अप्रतिम, दैवी आवाजात आहे...

वेळ प्रसंगी या सर्वजणींची
आठवणच आपलं जगणं
सुंदर करायला मदत करेल...

*आपण जशा जन्माला आलो*
*आहोत, तशा सुंदरच आहोत,*
*ही खूणगाठ मनाशी बांधून*
*टाकली, की सौंदर्याकरीता*
*दुसर्‍या कुणाच्या पावतीची*
*गरज पडत नाही आणि*
*अवघं विश्व सुंदर भासतं...!!!*



Thursday, February 16, 2017







न्यायमूर्ती रानडे यांनी   एक फार सुंदर कल्पना मांडली....

ते म्हणाले, " विश्वाची निर्मिती, उत्क्रांती करतानाही 'त्या'ला संगीताचा आधार घ्यावासा वाटला. कसं ते पहा...

प्रथम सा म्हणजे सागरात जीव निर्माण झाले...

नंतर रे म्हणजे रेतीत म्हणजे जमिनीवर जीव निर्माण झाले...

नंतर ग म्हणजे गगनात पक्षी निर्माण झाले...

नंतर म म्हणजे मनुष्याची निर्मिती झाली...

प म्हणजे मनुष्यात जो परोपकारी तो श्रेष्ठ...

त्यानंतर ध म्हणजे जो माणूस धर्माने वागतो तो श्रेष्ठ...

त्यानंतर नी म्हणजे जो इंद्रिय नियमन करतो तो जास्त श्रेष्ठ....

शेवटी वरचा सा म्हणजे ज्याला 'साक्षात्कार' झाला तो सर्वात श्रेष्ठ मनुष्य....

किती सुंदर कल्पना आहे जीवनाच्या उत्क्रांतीची...!!!
Don't know who wrote this... But beautiful

Somewhere between “Crying loudly to seek attention”
and “Crying silently to avoid attention”,
we grew up!!

Somewhere between
“Katti!!” and “Blocked”,
we grew up!!

Somewhere between
“ 7 pani puris for 1 rupee” and
“1 pani puri for 7 rupees”,
we grew up!!

Somewhere between
“Ground mai aaja” and
“Online aaja”,
we grew up!!

Somewhere between
“Craving for pizza” and
“Craving for home food”,
we grew up!

Somewhere between
“Believing in happy endings” and “Accepting the reality”,
we grew up!!

Somewhere between
“stealing eclairs of your sis” and “Bringing Silk for her”,
we grew up!!

Somewhere between
“Just five more mins Mom” and “Pressing the snooze button”,
we grew up!!

Somewhere between
“Broken Pencils” and
“Broken Hearts”,
we grew up!!

Somewhere between
“Crying out loud just to get what we want” and
“Holding our tears when we are broken inside”,
we grew up!!

Somewhere between
“We are Best Friends Forever” and “Knowing that nothing truly lasts”,
we grew up!!

Somewhere between
“I want to grow up” and
“I want to be a child again”,
we grew up!!

Somewhere between
“Lets meet and plan” and
“Lets plan and meet”,
we grew up!!

Somewhere between
“Eagerly waiting” and
“Forever waiting”,
we grew up!!

Somewhere between
“Parents fulfilling our wish” and
“We Fulfilling our parent’s dream”,
we grew up!!

Somewhere between
“Waking up at 6 am” and
“Sleeping at 6 am”,
we grew up!!

And as we grew up, we realized how, silently but surely ,our lives have changed...!! 😊




प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता....  त्यांच्याच "चांदणझुला" मधून एक नवी कोरी कविता......

"जगणं विसरू नकोस...."

"सखे,"
जगाकडे रोज नव्याने..
बघणं विसरू नकोस....
सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला निराश करणारे
अनेक क्षण येतील...
पाय घालून पाडणारे
अनेक जण येतील...

त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...

कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला सुद्धा मन आहे
याचा विचार कर...
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर...

काळजापासून माया तुझी
झरणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

रडावंसं वाटेल तेव्हा
रडून मोकळी हो...
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो....

रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला कुणाला पुरावे
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला परतून
यायची गरज नाही....

ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

कवी गर्दे यांनी स्वतः मला mail through त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे तो खालीलप्रमाणे
प्रा. गुरुराज गणेश गर्दे- ०9422058288
नुकतंच मी "पाखराची वाट" वाचलं विजय पाडळकरांचं! छोट्या कथा, लेख, टिप्पणी आहेत त्यात. एक फार सुंदर आहे कथा!
नवरा आणि बायको मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात आणि त्यांचं छोटं मूल शाळेसाठी आजीकडे राहातं. आठवड्याची गाठभेट होत असते. नवऱ्याची परत बदली झाल्यावर काही दिवसांनी बायको मुलाला घेऊन दोन दिवस येते सुटीसाठी. रविवारी घरमालकांकडे जेवताना मालकीणबाई म्हणतात, " या आता इकडं! कुठवर साहेब एकटे राहातील?" ही बिचारी गप्प बसते. दुपारी ती एकच खोली स्वच्छ करते. थोडीशी असणारी तांब्या पेले भांडी चकाचक घासून ठेवते, दोरीवर पडलेले कपडे धुवून घड्या घालून ठेवते. गहू पाहाते डब्यात आणि साफ करून दळून आणून ठेवते. नवरा तिला सांगत राहातो की बाई, थोडा आराम कर. पण ही सगळी कामं उरकून मग ती नोकरीच्या गावी परतते. सोमवारपासून तोच तो दिनक्रम सुरू होतो आणि गुरूवारी नवऱ्याचं पत्र येतं. " दीड दिवस तू आलीस आणि या खोलीचं घर झालं. काल सकाळी तुला स्टँडवर सोडून मी परस्पर ऑफिसला गेलो आणि संध्याकाळी परतलो तर खोलीचा कायापालटच झालेला दिसला. खोलीभर फिरलेला तुझा हात मला सर्वत्र दिसू लागलाय. तू होतीस तेव्हा तुझ्या असण्याने खोली भरून गेली होती आणि आज तू इथे नाहीस तर तुझ्या आठवणीनी खोली तितकीच भरून गेली आहे. रात्री स्वयंपाक करायला बसलो. कपाटातून पिठाचा डबा काढला आणि उघडून पाहते तर- माझ्या अंगावर सरसरून शहारा आला. डब्यात मावावे म्हणून तू पीठ दाबून बसवले होते. तसे दाबताना तुझ्या हाताचा ठसा त्या पिठावर स्पष्ट उमटला होता अगदी रेषा न् रेषांसह. मी त्या ठशाकडे पाहातच राहिलो. तो केवळ पिठावरचा ठसा नव्हता. माझ्या एकटेपणावरचा तुझ्या अस्तित्वाचा उमटलेला ठसा होता तो. पीठ काढून तो मोडण्याचं धैर्य मला झालं नाही."

यापेक्षा वेगळं असं काही valentine असेल????

*फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण सालं ज्यात त्यात....*-

                         

...अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणुस "चाललो हो शेट मी आता..." असं म्हणुन निघाला की कसंतरीच होतं.
....जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं..
....आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं..
....गणपती विसर्जनाचे वेळी "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणताना कसलासा आवंढा दाटुन येतो..
.....असंच काहीसं भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी विझलेल्या पणत्या काढतानाही होतं..
....अनेक वर्ष आपण ज्यात आनंदाने काढली ती चाळ पाडली की त्या विटामातींचे ढिगारे बघवत नाहीत. उनवारा पावसापासुन आपलं रक्षण करणारे ते पत्रे बघितले की काहीतरी विचित्रच होतं..
....आठवडाभर आलेले पाहुणे निघाले की अजुनही त्यांच्या चपला लपवाव्याश्या वाटतात रे...
.....शाळेच्या रम्य दिवसांपासुन स्मृतीत जपुन ठेवलेलं कोपऱ्यावरचं चिंचेचं झाड पावसाने पडलं की आपल्या आतमध्येही कसलीशी "पडझड" होते...
.....पहिला पाऊस आला की अजुनही सुट्टी संपल्याचं दु:ख होतं..
.....ट्रॅफिक सिग्नलला भर दुपारी उपाशीपोटी माय पोराला घेऊन भिक मागताना दिसली की आपल्याच पोटात खड्डा पडतो, तिच्या आणि त्या पोराच्या काळजीने..
.....बदली झाली म्हणुन गाव सोडुन जाणारे शाळासोबती पुन्हा कधीही भेटण्याची शक्यता नसते ते दु:खंही असंच काहीसं...
.....अनोळखी लग्नात, कोणाचीही मुलगी सासरी जाताना आपला कंठ कशाला बुवा दाटुन येतो?
.....
.....या आणि अशा असंख्य Involvements जपत आपण आयुष्य काढतो...
.....कसलासा "ओलावा" कायम आपल्या सोबत असतो. बराचसा भिजवुन टाकणारा, पण कुठेतरी आपला एक कोपरा जिवंत ठेवणारा.....!  
आज मीच मला चाॅकलेट दिलं,
एक घट्ट मिठी मारून "लव यू " म्हटलं,
मीच केलय एक प्राॅमिस मला,
कायम खूश ठेवणार आहे मीच मला....

Priority लिस्टवर माझं स्थान नेहेमीच शेवटी,
ते आणिन आता थोडतरी वरती,
सगळ्यांचं सगळं करताना विसरणार नाही स्वतःला,
मीच एक फूल दिलय आज मला....

खूप खूप वर्षांनी खाली ठेवलाय
तो सुपरवुमनचा किताब,
मन होऊन जाऊदे फुलपाखरू आज...

नाही जमत मला तिच्यासारखा स्वयंपाक,
आणि येत नाही तिच्यासारखं रहायला झक्कास,
येत नाही टाईम मैनेजमेंट मला,
काँम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गैजेट्स मधे मी "ढ" गोळा....

आज मान्य मला माझे सारे दोष अन् कमतरता,
माझ्यातला वैशाख,
कारण आज उतरवून ठेवलाय,
मी आदर्श भारतीय नारीचा पोषाख....

हिचे केस, तिची उंची, हिचा रंग, तिचा आवाज,
नको ती तुलना, नको ती इर्ष्या,
तोच स्त्रीयांचा खरा शाप...
आज मी मिळवणार आहे अपूर्णतेतल्या पूर्णतेचा उःशाप....

मी शिकवणार आहे मला, जशी आहे तशी आज,
आरश्यासमोर उभी राहून बघणार आहे स्वतःला,
ना कोणाची
बायको, सुन, आई, मुलगी म्हणून...  फक्त मला...
गुणदोषांसकट स्वतःच्या प्रेमात पडायचय मला...

का हवा मला
नेहेमीच घोड्यावरून येणारा स्वप्नातला राजकुमार?
मीच होणार माझ्या सुखाची शिल्पकार...
आत्ममग्नतेच्या तळ्याकाठी बसेन काही काळ,
आणि फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग!!!
रात्री १०.०० च्या सुमारास बाळ येण्याची चाहुल लागली तसा
मी O.T. पुढे कान देऊन आणि डोळे विस्फारुन येरझाऱ्या मारु लागलो..!!
१०.४५ वाजता बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मी बाळाच्या स्वागतासाठी O.T. च्या बाहेर सज्ज झालो..!
रात्रीच्या शांततेत बाळाच्या रडण्याचा आवाज(बापाच्या आवाजाला खुन्नस) संपुर्ण हाॅस्पिटल दणाणुन सोडत होता आणि पहिलाच गुण बापाचा घेतल्याचं आत्मिक समाधान देत होता..!
११.०० वाजले तरी O.T. तुन बाळाच्या आवाजा शिवाय काहीच येत नव्हतं..
बाळ इतकं का रडतयं?
बायको व्यवस्थित आहे ना?
Ki आहे की Ka आहे?
त्यांना बाहेर आणायला इतका वेळ का लागतोय असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात सुरू होते..!
इतक्यात O.T. चा दरवाज़ा उघडला आणि बायकोला बाहेर आणण्यात आलं.. बायकोला बघुन जीव भांड्यात पडला.. प्रसुती नैसर्गिक झाली आणि एका गोंडस परीचं आगमन झाल्याचं कळलं..!! मला नाचावं की उड्या मारव्या तेच कळत नव्हतं..!!
परीचं रडणं काही थांबत नव्हतं आणि अजुन ती O.T. तच होती, त्यामुळे जीव कासावीस होत होता..! पुढची ५ मिनीटे एकदम सगळं थांबल्यासारखं झालं... शेवटी परी दुपट्यात गुंडाळुन बाहेर आली पण तिचं रडणं काही थांबत नव्हतं..."जा पप्पाकडं" म्हणत नर्स ने परीला माझ्या हातात ठेवलं...!!
त्या इवल्याशा जिवाला पहिल्यांदा हातात घेतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता...!!
माझ्या तोंडातुन फक्त दोनचं शब्द बाहेर पडले "ये पिल्लु"...!!

(ती पोटात असताना जेव्हा केव्हा मी घरी असेल आणि ती हालचाल करायची तेव्हा मी नेहमी फक्त हेच बोलायचो "ये पिल्लु काय चाललयं? मी तुझा बाबा बोलतोय..! मजेत ना ! तुझी आई वेडी आहे तिचं नाही काही एेकायचं.. माझंच एेकायचं.")

आणि काय आश्चर्य...इतका वेळ जिवाच्या अकांताने रडणारी माझी लेक चक्क शांत झाली, आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली...!
जणु काही तिलाच मला पहायची घाई झाली होती...!
आता ती शांत झाली होती आणि माझ्या डोळ्यात पाणी...!

साक्षात्कार यालाच म्हणतात बहुतेक..!!

आजही ते दोन शब्द तिच्यासाठी आधार आहेत तर माझ्यासाठी माझा उद्धार..!

त्यामुळे मिशीदांचे ते वाक्य...

"आकाशातला परमेश्वर अवचितपणे कधीतरी आपल्यावर प्रसन्न होतो आणि सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आपल्या ओंजळीत अलगद टाकतो....
लोक त्याला आपली " मुलगी" म्हणतात."